शुक्रवार, 28 फ़रवरी 2014

टाळ – मृदुंग नव्हे तर झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे देणारे गाडगेबाबा !

‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार महाराष्ट्रातील ज्या संताने जनसमूहाला हाती टाळ – मृदुंग नव्हे तर झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले त्या गाडगेबाबांची 27 ङ्गेब्रुवारी रोजी जयंती. महाराष्ट्राच्या भूमीत एकापेक्षा एक महान रत्ने होऊन गेली, ज्यांनी समाजाला परिवर्तनाची नवी दिशा दिली. त्यातीलच एक महान रत्न म्हणजे गाडगेबाबा! गाडगेबाबा स्वत: साक्षर नव्हते तर अंगठेबहाद्दर होते. पण त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे अनेक साक्षर लोकांचे डोळे खाडकन् उघडले आणि स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने त्यांनीही परिसर स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतला. आणि अंर्तमनात जमलेली अंधविश्‍वासाची जळमटे देखील साङ्ग केली. माणूस सुशिक्षित असला म्हणजे सुसंस्कृत असेलच याची शाश्‍वती नसते. परंतु गाडगेबाबांनी अशिक्षित आणि सुशिक्षित दोन्ही समाजाला खर्‍या अर्थाने सुसंस्कृत बनविले. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो आणि घरातील कचरा रस्त्यावर ङ्गेकतो. परंतु समाज हे देखील आपले दुसरे घरच आहे नव्हे ते समाजमंदिर आहे. ते घाण करुन कसे बरे चालेल? हा अत्यंत मोलाचा विचार गाडगेबाबांनी समाजमनात स्वत:च्या कृतीने रुजविला.
गाडगेबांबांचे व्यक्तिमत्व आगळे – वेगळे असेच होते. सध्या प्रसिध्दीचा जमाना आहे. कणभर काम करायचे आणि मणभर प्रचार करायचा हा नवा ङ्गंडा अनेकांनी आपलासा केला आहे. परंतु गाडगेबाबांनी प्रसिध्दीपासून दूर राहून आयुष्यभर निरपेक्षपणे समाजागृतीचे मणभर काम केले आणि आदर्श समाजसुधारक कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण सर्वासमोर ठेवले. गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे 23 मार्च 1876 रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. दारुने कुंटुंबाचा विनाश कसा होतो हे त्यांनी बालपणीच अनुभवले होते. वडिलांच्या निधनानंतर ते आईबरोबर मामाकडे गेले. गाडगेबाबांचे मन अभ्यासात कधीच रमले नाही. त्यापेक्षा त्यांना रानात गुरे चारायला घेऊन जाण्यातच आनंद वाटायचा. समाजात सुरू असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा ङ्गेकून द्याव्यात असे त्यांना मनोमनी वाटायचे. परंतु त्याला कृतीची जोड मिळणे गरजेचे होते. स्वत:च्या मुलीच्या बारशाचेवेळी गाडगेबाबांनी एक धाडसी निर्णय घेतला. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता, त्यांनी परंपरागत रुढीप्रमाणे बारशाचेवेळी उपस्थितांना दारु आणि मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले. या उदाहरणातून गाडगेबाबांनी समाजासमोर एक आदर्शच घालून दिला. मी योग्य तेच करणार! हेच त्यांनी केवळ शब्दाने नव्हे तर कृतीने सांगितले. समाजात कोणीही व्यक्ती संकटात असली की गाडगेबाबा तेथे धावून जात आणि त्यांना मदतीचा हात देत. आयुष्याच्या अखेरपर्यत गाडगेबाबांनी समाजरुपी ईश्‍वराची पूजा करण्याचे व्रत अंगिकारले होते.
गाडगेबाबांचे मन संसारात ङ्गारसे रमले नाही. 1 ङ्गेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी संसाराचा त्याग करुन संन्यास स्वीकारला आणि समाजमनाची स्पंदने टिपण्यासाठी तीर्थाटनास प्रारंभ केला. गाडगेबाबा जेथे जात तेथील लोकांत मिसळत असत. त्यांची सुख – दु:खे समजून घेत. यातून त्यांना ग्रामीण आणि शहरी समाजावर मोठ्या प्रमाणावर अज्ञान, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी – परंपरा यांचाच पगडा असल्याचे निदर्शनास आले. तो दूर करण्यासाठी त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत अंगिकारले. गाडगेबाबांचा पोशाख म्हणजे हातात खराटा, अंगावर चिंध्या आणि डोक्यावर खापर. यामुळे त्यांना लोक ‘गोधडीमहाराज’असेही म्हणायचे. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असायचे त्यामुळे त्यांना ‘गाडगेबाबा’ हे नाव पडले.
गाडगेबाबा कधी मंदिरात गेले नाहीत मात्र सायंकाळच्या वेळी ते मंदिराबाहेर कीर्तन,प्रवचन करीत असत. साध्या सोप्या उदाहरणातून ते जनजागृती करीत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असे. गाडगेबाबा तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानत असत. कीर्तनातून ते, चोरी करु नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा धर्माच्या नावाखाली मुक्या प्राण्यांची हत्या करु नका, अस्पृश्यता पाळू नका असे जनतेला सांगत. एखाद्याने त्यांचे  कीर्तन  ऐकले तरी त्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तनाचे वारे घोंघावू लागायचे. कीर्तनातून गाडगेबाबा उपस्थितांशी संवाद साधायचे. आपणास आश्‍चर्य वाटेल पण गाडगेबाबांचे कीर्तन ऐकायला डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आचार्य अत्रे हे मान्यवर श्रोत्यात बसत असत. डॉ. बाबासाहेबांनी स्वबांधवांच्या अन्यायनिवारणार्थ धर्मांतर करण्यापूर्वी गाडगेबाबांचा सल्ला घेतला होता.  ‘गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला’ हे त्यांचे आवडते भजन. त्यांचे कीर्तन कसे असायचे माहितेय? गाडगेबाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.‘
गाडगेबाबा स्वत: शिकलेले नव्हते तरीही त्यांनी निरक्षर समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. लोकांच्या ह्रदयात समाजकार्याची मशाल प्रज्वलित केली. भुकेलेल्यांना अन्न मिळण्यासाठी अन्नछत्रे उभारली. गरीब मुलांना शिक्षण देेण्यासाठी शाळा चालविल्या, महत्त्वाच्या शहरात धर्मशाळा उभारुन अनेकांना निवारा उपलब्ध करुन दिला. रस्ते साङ्ग करुन समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एक ना दोन! गाडगेबाबांच्या उपदेशास अनुसरुन आपण आपल्या जीवनात काही समाजोपयोगी गोष्टीचे पालन जरी आपण प्रत्येकाने केले तरी सामाजिक परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.

गुरुवार, 27 फ़रवरी 2014

आरोग्य दिनाच्या निमित्ताने…

स्वातंत्र्यपूर्वकाळात स्त्रियांवर समाजव्यवस्थेने अनेक बंधने लादलेली होती. कित्येकजणींनी त्या बंधनातच राहणे पसंत केले तर काही स्त्रियांनी मात्र ‘ती’ बंधने झुगारली आणि विविध क्षेत्ररुपी विस्तीर्ण अशा अवकाशात उत्तुंग भरारी घेतली. कालांतराने अन्य स्त्रियांनी त्यांचेच अनुकरण केले. स्त्रियांनी कोणतेही शिक्षण न घेता केवळ ‘चूल आणि मूल’ यातच रममाण व्हावे अशी सर्वसाधारण समाजमनाची धारणा असलेल्या काळात पुण्यातील एका धाडसी स्त्रीने पतीच्या मदतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जेव्हा थेट परदेशवारी केली तेव्हा त्या दांपत्यावर काय भयंकर परिस्थिती ओढवली असेल याची नुसती कल्पना तरी करुन बघा! मनात जिद्द आणि आत्मविश्‍वास असला की येणारे सर्व अडथळे सहजी पार करता येतात हेच खरे! भारतातील पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी अर्थात डॉक्टर असे नामाभिधान मिळविणार्‍या त्या धाडसी स्त्रीचे नाव म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी!
आनंदीबाई यांचा जन्म पुण्यात 31 मार्च 1865 रोजी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती. त्या प्रथेस अनुसरून वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आनंदीबाईंचा विवाह तिच्याहून अकरा वर्षांनी मोठ्या असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव कल्याण येथे पोस्ट ऑङ्गिसात कारकून म्हणून कार्यरत होते. त्याकाळी रावबहाद्दुर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांची ‘प्रभाकर’ नावाच्या साप्ताहिकात प्रसिध्द होणारी सुधारकी  विचारांची बहुचर्चित ‘शतपत्रे’ गोपाळराव आवडीने वाचत असत. कळत नकळत त्यातील विचारांचा पगडा गोपाळरावांवर बसण्यास प्रारंभ झाला होता. साहजिकच समाजाचा विरोध झुगारुन गोपाळरावांनी आनंदीबाईंना इंग्रजी शिकविण्यास प्रारंभ केला आणि तो तडीस नेला.
दरम्यानच्या काळात आनंदीबाईनी वयाच्या चौदाव्या वर्षी एका मुलास जन्म दिला परंतु वैद्यकीय सुविधेअभावी अवघ्या दहा दिवसातच त्याचा मृत्यू झाला. याचा ङ्गार मोठा मानसिक आघात आनंदीबाई यांच्यावर झाला. यामुळे खचून न जाता आनंदीबाईंनी कितीही कष्ट पडले तरी शिकून डॉक्टर होण्याचा निश्‍चय केला. यात त्यांचा, ‘भविष्यात वैद्यकीय सेवेअभावी अन्य स्त्रिया पुत्रप्रेमाला पारख्या होऊ नयेत.’ हाच हेतू होता. आता, वैद्यकीय शिक्षण घ्यायचे म्हणजे परदेशवारी आली! साहजिकच समाजविरोध आणि पैशाचा प्रश्‍नही आलाच. परंतु इच्छा असली की मार्ग निघतो असे म्हणतात. त्याचप्रमाणे जोशी दांपत्य करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले आणि अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीने 1883 साली वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आनंदीबाईंना अमेरिकेतील ‘वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑङ्ग पेन्सिल्व्हानिया’ या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कमी वयात प्रचंड दगदग झाल्याने त्याचा ताण आनंदीबाईंना झेपला नाही. त्यांची प्रकृती ढासळू लागली. अशा स्थितीतही त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि 11 मार्च 1886 रोजी त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. त्यांना एम.डी.ही पदवी मिळाली. आनंदीबाईंनी महाविद्यालयात जो प्रबंध सादर केला त्याचे नाव होते,‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र’. डॉक्टर ही पदवी मिळाल्यानंतर व्हिक्टोरिया राणीनेही त्यांचे खास अभिनंदन केले होते. अमेरिकेतील महाविद्यालयात झालेल्या पदवीदान समारंभास भारतातून स्वत: गोपाळराव आणि समाजसेविका पंडिता रमाबाई रानडे या उपस्थित होत्या.
आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे चांगले स्वागत झाले. परंतु अमेरिकेतून परतत  असतानाच त्यांना क्षयरोगाची बाधा झाली. बोटीवर कोणत्याही गोर्‍या वैद्यकीय अधिकार्‍याने आनंदीबाईंवर उपचार केले नाहीत कारण काय तर म्हणे, आनंदीबाई या गौरवर्णीय नाहीत! आणि भारतात परतल्यावर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी देखील महिला डॉक्टरवर उपचार करण्यास नकार दिला. क्षयरोगाकडे दुर्लक्ष करुन त्यांनी कोल्हापूर येथील अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात महिला कक्ष प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतला. दुर्दैवाने आजार बळावत गेला आणि 26 ङ्गेब्रुवारी 1888 रोजी पुणे येथे त्यांना मृत्यूने गाठले. अवघे बावीस वर्षे आयुष्य मिळून देखील त्यांनी खूप मोठे कार्य केले परंतु त्याचे ‘महत्त्व’ त्याकाळातील अनेकांना कळलेच नाही.
स्वत: डॉक्टर होऊनही कोणावरही उपचार करण्याचे भाग्य आनंदीबाईंना मिळाले नाही यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आपल्यापैकी कितीजणांना आनंदीबाईंचा परिचय आहे माहित नाही. पण अमेरिकेतील जनतेने मात्र आनंदीबाईंची दखल घेतली. तेथील नागरिक असलेल्या कार्पेटर नावाच्या इसमाने त्यांच्या कुटुंबाच्या स्मशानात आनंदीबाईंचे प्रतिकात्मक थडगे बांधले आणि त्यावर,‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या.परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळविणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरुन त्यांच्या स्मृतींचेच अनोख्या पध्दतीने जतन केले. स्त्रियांचे आरोग्य हा कुटुंबाचा मौल्यवान ठेवा असल्याचे म्हणतात. बहुधा हे लक्षात घेऊनच आनंदीबाईंच्या स्मृतीदिनी म्हणजेच 26 ङ्गेब्रुवारी हा दिवस शासनातर्ङ्गे राष्ट्रीय महिला आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज देखील स्त्रियांपुढे आरोग्य विषयीच्या विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी स्त्रियांमध्ये आणि समाजात देखील जनजागृतीचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निश्‍चय आपण सर्वांनीच करुया

गुरुवार, 13 फ़रवरी 2014

टोलच्या मुद्दयावर विरोधकांची एकी का नाही?

नेहमीप्रमाणे शिवसेनेचा मुद्दा मनसेने सफाईने उचलला आणि त्यावर आंदोलनाचे रणशिंग फुंकले. काहींना ती पिपाणी वाटली, काहींना नुसतीच गर्जना वाटली तर काहींना नाटकाचा ड्रामा वाटला. परंतु मनसैनिकांनी कमी कालावधीकरीता आंदोलन करुन अपेक्षित ते यश मिळविले असल्याचे तरी प्रथमदर्शनी दिसत आहे. वास्तविक  कोल्हापूर टोलप्रश्‍नी आंदोलनात शिवसेनेने पुढाकार घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील टोलप्रश्‍न शिवसेना आता हातात घेणार आणि रान पेटवणार असे वाटत असतानाच अचानक मनसेने त्यात उडी घेतली. पुणे येथील भाषणात राज ठाकरे यांनी मुद्देसुद मुद्दे मांडून टोलचा पोलखोल केली. आणि कालच्या रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली. अन्यायी टोल हटलाच पाहिजे यावर जर एकमत होत असेल तर टोलविरोधी आंदोलनात सर्व विरोधी पक्ष का एकवटत नाहीत? हाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. प्रत्येक प्रश्‍नाकडेच राजकीय चष्म्यातून पहायचे बंद केले पाहिजे. निवडणुकांकडे पाहून दुसर्‍यांचे आंदोलन कसे फ्लॉप झाले याबाबत प्रसारमाध्यमांना बाईट देण्यापेक्षा समाजकारणाला महत्व दिले पाहिजे असेच सामान्यांचे मत आहे.
सत्ताधारी पक्ष हा टोलच्या बाजूने आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, भाजपा , आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांची महायुती झालेली आहे. मनसे स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार आहे. असे असले तरी वरील सर्व पक्ष हे विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे शासनाच्या विरोधात जर एखादे आंदोलन असेल तर त्यात केवळ ज्यांनी आंदोलन पुकारले आहे तोच पक्ष का सहभागी होतो? इतर पक्षांना त्या पक्षाबाबत अस्पृश्यता का वाटते? हे कळत नाही. ज्या पक्षाने आंदोलन पुकारले आहे त्याला त्याचा राजकीय लाभ होणार यात शंका नाही. परंतु असे असले तरीही इतर विरोधी पक्ष संबंधित आंदोलनात सहभागी झाले तर निश्‍चितपणे त्यांच्याबद्दलचा आदर वाढण्यास मदत होईल यात शंका नाही. परंतु राजकारण एक्के राजकारण हेच एकदा धोरण ठरल्यावर दुसरी अपेक्षाच नाही.
आता मनसेने टोलप्रश्‍नावर केवळ हमरस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आंदोलनाचा प्रभाव शहरात काही दिसला नाही हे खरे आहे. केवळ पाच तास आंदोलन केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी 10 वाजता चर्चेसाठी राज ठाकरे यांना बोलावले आहे. चर्चा फिस्कटली आणि सरकारने कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही असे गृहीत धरले तरी दि. 21 चा दिवस मनसेच्या हातात आहे. कारण त्या दिवशी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्टेप बाय स्टेप आंदोलन कसे करायचे याचे हे चांगले उदाहरण आहे. एकदमच रुद्रावतार धारण केला की समाजात चुकीचा संदेश जातो. परंतु समोरच्याला योग्य मुदत देऊन नंतर आक्रमकपणे आंदोलन केले तर त्या आंदोलनास सामान्यांचा पाठिंबा मिळतो हे सूत्र मनसेने धरले आहे. आज म्हणावा तसा तमाशा झाला नसला तरी नजीकच्या काही दिवसात महाराष्ट्रात तमाशा होणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सध्या तरी मनसेचे एकला चलो असेच धोरण आहे. आता याचा फटका महायुतीला किती प्रमाणात बसतो ते नजीकच्या काळातच समजेल.

 

बुधवार, 12 फ़रवरी 2014

लक्ष आजच्या ‘तमाशा’ कडे!

राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेपूर्वी दिलेला इशारा आज सत्यात उतरणार आहे. नऊ तारखेला सभेत मुद्दे मांडल्यावर महाराष्ट्रात काय ‘तमाशा’ होतो ते बघा अशा अर्थाचे वक्तव्य राज यांनी केले होते. अखेर तो दिवस उगवला आहे. आज कोणत्याही परिस्थितीत लोकशाही मार्गाने राज्यातील सर्व हमरस्ते जाम करण्यात येतील असा इशारा काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार बैठकीत राज यांनी दिल्याने आता सर्वाचेच लक्ष आज काय होणार? याकडेच लागून राहिले आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून ‘राज यांचे नाव बदलून नवे नाटक’ अशी टिका करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना ज्यांच्या अंगावर साधी डास मारल्याचीही केस नाही त्यांनी याबाबतीत बोलू नये असा ठाकरी सल्ला राज यांनी देतानाच सरकारला याप्रश्‍नी दि. 21 फेब्रुवारी पर्यत हा प्रश्‍न मार्गी लावण्याची मुदत दिली आहे. एकूणच अजून काही दिवस तरी महाराष्ट्र ढवळून निघणार असून सतत राज यांचेच नाव चर्चेत राहणार आहे.
मनसे म्हणजे तोडफोड हे समीकरण झाले असताना आज मनसैनिक चक्क अहिंंसात्मक पध्दतीने आंदोलन करणार असल्याने अनेकांना आश्‍चर्य झाले असेल परंतु हा बदल अल्पकाळासाठीच आहे. कारण राज यांनी कालच्या पत्रकार बैठकीत दि. 21 पर्यत या प्रश्‍नाचा निकाल लागला नाही तर आम्हाला आमच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल अशी धमकीच राज्य सरकारला दिली आहे. परवाच्या सभेत राज यांनी जे टोलप्रश्‍नी मुद्दे उपस्थित केले ते बिनतोड असेच होते. त्यामुळे शिवसेनेसह भाजपानेही केवळ विरोधाला विरोध हे  धोरण ठेवून उपयोग नाही. शिवसेनेकडून मनसेवर नाटक कंपनी म्हणून टिका करण्यात आली असली तरी महाराष्ट्रात याच नाटक कंपनीने सेनेच्या तोंडास फेस आणला होतो हे विसरुन कसे बरे चालेल?
टोलप्रश्‍नी म्हणावा तसा जनतेचे समर्थन राज यांना मिळत नसल्याचेच दिसत होते. कारण आतापर्यंतचे आंदोलन हे हिंसक पध्दतीचे होते. परंतु आज होणार्‍या आंदोलनात सामान्य नागरिक सहभागी होतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर धर्मांधांनी केलेल्या दंग्यानंतर राज यांनी जो भव्य मोर्चा काढला होता. त्याला खरेच प्रतिसादही चांगला मिळाला होता यात वादच नाही. त्यामुळे जनतेचाच प्रश्‍न घेऊन निघणार्‍या 21 च्या मोर्चाकडेही सर्वांचे लक्ष आहे. तोपर्यत सरकारने ठोस पावले उचलली तर चांगले होईल अन्यथा त्यानंतर तोडफोडीचेच सत्र महाराष्ट्रात पहावयास मिळेल हे नक्की!

 

मंगलवार, 11 फ़रवरी 2014

धरणे, जाळपोळ, तोडाफोडी!

सध्या देशात काय सुरु आहे तेच सामान्य माणसाला कळेनासे झाले आहे. तिकडे दिल्लीत मुख्यमंत्री स्वत: रस्त्यावर उतरुन धरणे आंदोलन करतात तर त्यांचे समर्थक पोलिसांशी आमने सामने भिडतात, महाराष्ट्रात विरोधी पक्ष असलेल्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे टोल घेताना कोणी  आडवे आले तर तुडवा असा आदेश देतात. कहर म्हणजे सत्ताधारी असणार्‍या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार एस.टी. जाळण्यापेक्षा सरळ मंत्र्यांच्या गाड्याच जाळा असा सल्ला आंदोलकांना देतात. काय चालले आहे काय? महात्मा गांधीच्या या भारतात शांततामय पध्दतीने आंदोलन करण्यास बंदी आहे का? जर नेतेमंडळीच हातघाईवर आली तर कार्यकर्ते बिथरणार नाहीत तर काय? आणि मग राडा झाला तर त्याला जबाबदार कोण? असाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे.
सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. परंतु या म्हणीला काही प्रमाणात का होईना परंतु दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावायचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल यांना आंदोलनाची पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे ते जरी मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्यातील आंदोलनाचा सुप्त गुण काही जाताना दिसत नाही. त्यामुळेच गणतंत्र दिवसाच्या काही दिवस अगोदर ते रस्त्यावर उपोषणाला बसले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले नसले तरच नवल. तुम्हाला जर उपोषणाला बसायचे होते तर रस्त्यावर बसायची काय गरज होती? जंतर मंतर, रामलीला मैदान रिकामीच होता ना! पण आपली दखल मिडीयाने घ्यावी अशी काहींची इच्छा असते त्याला आपण काय करणार? तिकडे दिल्लीत अशी तर्‍हा तर महाराष्ट्रात थेट तोडफोड आणि जाळपोळीचेच आदेश वरिष्ठ नेते देताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात टोल आंदोलनाचा विषय गाजतो आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्षालाच या आंदोलनाचे श्रेय घ्यायचे आहे. मग त्यात मनसे तरी कशी मागे राहिल बरे? टोलचा मुद्दा कोणाचा? याच मुदयावरुन शिवसेना आणि मनसे यांच्यात कलगीतुरा रंगलेला पहायला मिळाला. तर आपणच अधिक आक्रमक आंदोलन करतो हे सिध्द करण्यासाठी की काय काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तुडवातुडवी करण्याचाच आदेश दिला. त्यांच्या आदेशाने दोन दिवस राज्यात तुडवातुडवीचा ट्रेलर पहावयास मिळाला. त्यामुळे जनजीवन ढवळले गेले. परंतु नंतर सर्व शांत झाले. पुण्यात राज ठाकरे यांच्या काल झालेल्या सभेला देखिल चांगली गर्दी झाली होती. आता सभेनंतर महाराष्ट्रात काय धुमाकुळ घातला जातोय याकडेच सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. विरोधी पक्षांनी तोडफोडीची भाषा केली तर एकवेळ समजण्यासारखे आहे. परंतु जर सत्ताधारी असणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाळपोळीची भाषा केली तर त्याला काय म्हणावे? पुणे येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खास. सुप्रिया सुळे यांनी अजब सल्ला दिला आहे. जळालेल्या एस टी पाहून वाईट वाटते त्यामुळे जाळायच्याच असतील तर नेत्यांच्या गाड्या जाळा असे त्यांनी सांगितले. हा सल्ला शिरसंवंद्य मानून कार्यकर्त्यांनी आता नेत्यांच्या गाड्या जाळल्या तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. राजकीय नेत्यांनी आपण काय बोलतो आणि काय कृती करतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा समाजात अशांतता पसरण्यास वेळ लागणार नाही.

शुक्रवार, 7 फ़रवरी 2014

बरे झाले बॉम्बस्फोटात संघाचे नाव आले!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मालेगाव आणि समझौता एक्सप्रेस मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची पूर्ण कल्पना होती आणि त्या स्फोटांना त्यांचा आर्शीवाद होता असा सनसनाटी (अर्थात प्रसारमाध्यमांच्या नजरेतून ) आरोप संशयीत आरोपी असिमानंद यांनी कॅरावॅन नावाच्या ऑनलाईन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यामुळे आता पुढील काही दिवस तरी प्रसारमाध्यमांना चर्चेसाठी नवीन विषय मिळाला आहे. देशात मोदी लाट असल्याने या ना त्या कारणाने हिंदुत्ववादी संघटना अथवा पक्षाच्या गंडस्थळावरच अर्थात प्रमुख नेत्यांवरच वार करण्याची केलेली ही नियोजनबध्द आखणी असू शकते. कारण असीमानंद यांच्या वकीलांनी तत्काळ असीमानंद यांनी अशी कोणतीच मुलाखत कोणत्याच मासिकाला दिली नसल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही असिमानंद यांच्या माध्यमातून खळबळजनक आरोप काहींनी केले होते. परंतु कालांतराने असीमानंद यांनीच न्यायालयात पोलिसांच्या दबावामुळे आपण त्यावेळी तसे बोललो होतो असे स्पष्टपणे सांगितल्याने पोलीस आणि काही प्रसारमाध्यमे तोंडावर पडली होती. त्यामुळे आता या नव्या आरोपांचा धुरळा किती दिवस उडणार याकडेच सार्‍यांचे लक्ष आहे.
भाजपा विरोधकांच्या मतानुसार देशाच्या पंतप्रधानपदी हिंदुत्ववादी माणूस बसता कामा नये. आणि नरेंद्र मोदी तर 20 वर्षाहून अधिक काळ संघाचे प्रचारक होते. म्हणचे कट्टर हिंदुत्वावादी ! त्यामुळे मोदींना विरोध केलाच पाहिजे. विरोधकांनी मोदींना अडकविण्यासाठी सर्व प्रयत्न करुन पाहिले, अजूनही करीत आहेत. परंतु मोदींवर डागल्या गेलेल्या आरोपांच्या फैरींचा काहीच उपयोग झाला नाही. उलट जितक्या वेळेला मोदींवर आरोप केले गेले तितक्या वेळेला सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये मोदींच्याच नावाची चर्चा झाली आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे मोदी यांनाच मिळाला आहे. हे कोणीच नाकारत नाही. निदान आपण ज्यावेळी आरोप करतो त्यावेळी आपल्याकडे योग्य पुरावा आहे का? याचीची चाचपणी संबंधित करीत नाहीत यासारखे दुर्दे:व दुसरे कोठले?
2006 ते 2008 या कालावधीत समझौता एक्सप्रेस, हैद्राबादमधील मक्का मशीद, अजमेर दर्गाह आणि मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाले. याप्रकरणी तपास यंत्रणेने अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली आहे. परंतु  पाच वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही एकही आरोप तपास यंत्रणेतील अधिकारी सिध्द करु शकलेले नाहीत. साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह अनेकांना जामिनही मिळू नये यासाठी कसे प्रयत्न करण्यात येत आहेत ते जनतेसमोर आहे. मध्यंतरी पनवेल बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयीत विक्रम भावे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यातून वाचकांपुढे बरीत आतील माहिती आली आहे.
बॉम्बस्फोटातील महत्वाचा संशयीत आरोपी जर तुरुंगात असेल तर त्याची मुलाखत कोणतेही प्रसारमाध्यम घेऊ शकते का? असाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. असीमानंद यांना जामिन मिळाल्याचे वाचनात नाही. म्हणजेच तथाकथित मुलाखत पत्रकारांनी तुरुंगात जाऊनच घेतली असणार यात शंका नाही. एकवेळ असीमानंद यांनी मुलाखतीत व्यक्त केलेल्या विचारात तथ्य आहे असे गृहीत धरले तर आतापर्यत तपास करणार्‍या अधिकार्‍यांना तत्काळ घरी बसवायला पाहिजे व इतके वर्षे तपासकामात जो जनतेचा पैसा खर्च झाला तो त्यांच्याकडूनच वसूल केला पाहिजे. पाच वर्षात जे संबंधित तपास अधिकार्‍यांना जमले नाही ते एका मुलाखतीने केले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? यापुढे सरकारने तपास यंत्रणाकडे प्रकरण सोपविण्याच्या ऐवजी ते सरळ कॅरावॅन नावाच्या ऑनलाईन मासिकाच्या संपादकांकडेच सोपवावे. अथवा आरोपी अटक झाला की लगेच त्याची मुलाखत घेण्याची प्रथा सुरु करावी म्हणजे निदान तपास कामात खर्च होणारा अनावश्यक पैसा तरी वाचेल.
काही महिन्यांनी लोकसभेची रणधुमाणी सुरु होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातूनच बघण्याकडे अनेकांचा कल आहे. साहजिकच केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी असीमानंद यांच्या दाव्यात तथ्य असू शकते असे सूचक विधान केले आहे. भाजपाने देखिल हे प्रकरण कॉग्रेस प्रायोजित असल्याचे सांगितले आहे. परंतु असे आरोप करीत बसण्यापेक्षा वस्तुस्थितीला सामोरे जाणे केव्हाही चांगले. बॉम्बस्फोटामागे कोणीही असो त्याची चौकशी ही व्हायलाच हवी या मताशी कोणीच दुमत नाही. साहजिकच केंद्रीय गृहमंत्र्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी  सरसंघचालकांची चौकशी केली तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. चौकशी झाली तर एका अर्थाने बरेच होईल कारण त्यानिमित्ताने प्रसारमाध्यमांमध्ये 24 तास संघाचे नाव येईल. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर चर्चा होतील आणि नागरिकांना सत्य काय ते समजेल. हे प्रकरण बुमरँग होण्याचीच अधिक लक्षणे असल्याचा राजकीय निरिक्षकांचाा अंदाज आहे. आतापर्यत दोन वेळा संघावर शासनाने बंदी घातली होती. परंतु त्यानंतर संघाची ताकद कित्येक पटींनी वाढल्याचा अनुभव शासनाने घेतला आहे. आात या प्रकरणात निवडणुकीच्या आधी सरकार काहीही करु शकते अशी सरकार विरोधकांमध्ये चर्चा आहे.  विनाशकाले विपरीत बुध्दी असे एक वचन आहे. त्या वचनाचा प्रत्यय नागरिकांना वारंवार येत असतो हेच खरे!

गुरुवार, 6 फ़रवरी 2014

जबरदस्त!

भोपाळ येथे काल एक जबरदस्त घटना घडली. जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका युवकाला किस देऊन त्याची जीभच तोडण्याचा पराक्र एका हाविद्यालयीन युवतीने केला आहे. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन प्रसाराध्यांशी बोलताना तीने ला त्या युवकाला जनची अद्दल घडवायची असल्यानेच ी त्याची जीभ तोडली. आता त्या युवकाला जन्भर किस करता येणार नाही असे सांगितले. यावरुन त्या युवतीचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत हेच स्पष्ट होते. छेडछाडीच्या घटना घडतातच परंतु त्याध्ये किती युवकांना शिक्षा होते. भोपाळच्या युवकाला अशी शिक्षा झाली आहे की त्याला एकच शब्द आहे तो म्हणजे जबरदस्त!
युवतींची छेडाछेडीच्या घटना बर्‍याच वेळा घडतात. परंतु त्यातील काहीच घटना पोलीस ठाण्यापर्यत जातात आणि क्वचित काहींना शिक्षा होतात हे आपण पाहतो. परंतु भोपाळच्या युवतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली परंतु छेडाछेडीची तक्रार नोंदवायला नव्हे तर जबरदस्तीने किस घेतलेल्या युवकाची जीभ आपण तोडली हे सांगायला! भोपाळ येथील कलानगर विभागातील कलेश र्शा नावाच्या युवकाने एका अठरा वर्षीय युवतीची छेडछाड केली व तिच्याकडे किस ागितला. युवतीने त्याला विरोध केला. परंतु कलेश ऐकायला तयार नव्हता. त्याुळे युवतीने त्याला किस दिला.परंतु त्याचवेळी त्याची जीभ दातात पकडून अशी चावली की जीभेचा तुकडाच पडला. वासनांध युवकाला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता पर्याय तीला दिसला नाही. आणि तोच पर्याय बरोबर होता असे त अनेकांचे झाले तर ते चुकीचे नाही.
युवतींची छेड काढणार्‍याला जर पोलिसांकडून शिक्षा होत नसेल तर ग भविष्यात अशाच घटनांची पुनरावृत्ती घडल्यास नवल नाही. कारण जर तक्रार नोंदवूनही न्याय ळित नाही अशी जर जनभावना र्निाण झाली तर युवतींनी जशास तसे चा पर्याय स्विकारला तर त्यात काही गैर आहे का? कोणत्याही प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा जोपर्यत प्रत्यक्षात होत नाही तोपर्यत अन्यायाचा रेषो कधीच की होणार नाही. आणि वारंवार अशा घटना घडतील

 

बुधवार, 5 फ़रवरी 2014

पाकड्यांवर एकतर्फी प्रेम कशाला?

भारत पाकिस्तानच्या संयुक्त बँडचा कार्यक्रम घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मुंबईतील पत्रकार बैठक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. पाकचे सैनिक आपल्या देशात घुसखोरी करुन जवानांची मुंडकी कापून नेतात, पाक दहशतवादी देशाला एक दिवसही शांतपणे झोपू देत नाहीत असे असताना कशाला पाहिजेत बँडची फालतू नाटके? असाच प्रश्‍न सामान्यांच्या मनात निर्माण झाला होता. नियोजित बॅडचाच बॅडबाजा वाजवून शिवसेनेने देशवासियांच्या मनातीलच भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. परंपरेप्रमाणे याला कॉग्रेसने निवडणुक स्टंटचे नाव दिले आहेे. त्याच कॉग्रेस सरकारला  पाकप्रेमाचे भरते आल्याने त्यांनी पुन्हा एकदा भारत पाक बससेवा सुरु करण्याचे सुतोवाच केले आहे. पाकला जशास तसे उत्तर द्यायचे सोडून आपले सरकार पाकला लव्हलेटर लिहिण्यातच मग्न असल्याचेच चित्र दिसते.
पाकने आता आपल्या सरकारचे पाणी जोखले आहे. जमीन मऊ लागल्यानेच पाकचे हस्तक आता कोपराने येथील जमीन खणत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन पाकचे कलावंतांना भारतीय रंगमंचावर त्यांची कला सादर करु द्यायची नवी प्रथा काही महाभागांनी पाडली आहे. या प्रकाराला कोणी विरोध केला की कलेच्या प्रांतात राजकारण कशाला आणायचे? असे बोंबलायला हे पाककलावंतप्रेमी मोकळेच असतात. परंतु आपले कलावंत जेव्हा पाकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास जातात तेव्हा मात्र पाकमध्ये त्यांना विरोध होतो. भारतील संगीत क्षेत्रातील ग्यानकोकीळा असलेल्या लता मंगेशकर यांना हा अनुभव आला आहे. इतर कलावंतांचा देखिल अनुभव वेगळा असण्याची शक्यता नाही. मग असे असताना एकतर्फी प्रेम करण्याचा आपण मक्ता घेतला आहे का? म्हणजे पाकने नेहमी आपल्याला कानफटावायचे आणि आम्ही मात्र त्यांना गुलाबाचे फुल द्यायचे. याला राष्ट्रकारण म्हणतात का?
शिवसेनेने योग्य तेच केले. पाक कलावंताचे नशीब म्हणायचे की त्यातल्या कोणी शिवसैनिकांचा मार खाल्ला नाही. हे जे कलावंत असतात त्यांनी कधी तरी भारतावरचे हल्ले थांबवा असे पाकला सांगितले आहे का? पाकचा साधा निषेधही करण्याचे सौजन्य ते पाळत नाहीत. आणि आम्ही त्यांना सन्मान द्यायचा. असतील ते मोठे कलावंत पण ते त्यांच्या देशात! भारतात येऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचा बुरखा घेऊन नखरे केले तर असाच प्रसाद मिळेल हा धडाच काल शिवसेनेने घालून दिला आहे. यापूर्वीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आदेशाने पाक कलावंतानी शिवसेनेचा दणका अनुभवला आहे. आता यावर कॉग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी हा प्रकार म्हणजे शिवसेनेचा निवडणुक स्टंट असल्याचे म्हटले आहे. पाकड्या कलावंताना विरोध करणे हा कोणाला निवडणूक स्टंट वाटत असेल तर त्यावर काय बोलणार? दलवाई साहेबांनी एकदा निवडणुक स्टंट कशा कशाला म्हणायचे याची अधिकृत यादीच एकदा जाहीर करावी. म्हणजे नागरिकांना तरी समजेल की निवडणुक स्टंट कशाला म्हणतात ते? म्हणजे राजकारण कोण करीत आहे ते जनतेला समजेल. आता तरी शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्य असल्याचेच अनेकांचे मत आहे हे नक्की !