मंगलवार, 8 अप्रैल 2014

भारतमातेसाठी मतदान करा !

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविण्याचा निर्धार आवश्यक आहे. मतदान शंभर टक्के झाले म्हणजे यशस्वी झाली असे नाही. मतदान का करायचे, कोणत्या गोष्टींचा विचार करुन करायचे. याचाही थोडा विचार करा. महागाईचा फटका बसलेला नाही अशी सर्वसामान्य व्यक्ती या देशात शोधून काढावी लागेल. शेतकर्‍यांनी गेली काही वर्षे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले आहे. मग ही महागाई कशामुळे? याचं उत्तर आहे. बेबंद भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. हजारो कोटींच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे डोळेझाक करणे आपल्याला यापुढे परवडणार आहे का, याचा मनाशी गांभीर्याने विचार करा. नाहीतर महागाईचा हा वणवा तुम्हा आम्हाला पुरता फस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि देशाला पूर्ण गिळंकृत केल्याशिवायही राहणार नाही. हे आपण उघड्या डोळ्यांनी स्वस्थपणे पाहत राहणार का?
रोजगाराच्या संधी आटल्या आहेत. उद्योगक्षेत्रातील गुंतवणुक मंदावली आहे. परकीय भांडवलाचा ओघ थांबला आहे. सेवाक्षेत्राची घोडदौड पूर्ण थांबली आहे. उत्पादनक्षेत्र नामषेश होईल. असे भयावह चित्र आहे. नव्याने उद्योग सुरु होण्यासाठी अनुकुलता नाही आणि नव उद्योजकांचे मनोधैर्य पूर्ण खचलेले आहे. विजेच्या टंचाईमुळे ना शेतकर्‍याला त्याची कामगिरी बजावता येतेय, ना उद्योगांना झेप घेता येतेय. आर्थिक पातळीवरील ही दाणादाण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात लोटणार का?
भारताच्या सीमा तर सुरक्षित नाहीतच, पण अंतर्गत सुरक्षेसाठी खिंडार पडलेले आहे. इंडियन मुजाहिदीनसारख्या शक्तींनी संपूर्ण देशात जाळे पसरले आहे आणि देशातील 275 जिल्ह्यात माओवाद्यांच्या आव्हानाने गंभीररुप धारण केलेले आहे. बुध्दीवंत म्हणविणारे लोक या शक्तींचे खुलेआम समर्थन करण्यात सोकावलेले आहेत.या देशाला अस्थिर करण्यात रस असणार्‍या परकीय शक्ती पूर्ण ताकदीनिशी तुटून पडलेल्या आहेत. कमकुवत सरकार, दुबळे नेतृत्व या देशात स्थैर्य निर्माण करु शकणार नाहीत. आहे हे ठिक आहे. असे तुम्हाला वाटते का?
धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा मतपेटीच्या राजकारणासाठी वापरला जात आहे. देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला समान न्याय, समान संधी उपलब्ध करुन देण्याचे तत्व पायदळी तुडविले जात आहे. अल्पसंख्यक समाजाला देशाच्या विकासप्रक्रियेत मनापासून सहभागी करुन घेण्याऐवजी त्यांच्या मनात भयगंड उत्पन्न करण्याची राजनीती वापरली जात आहे. भाषा आणि जात या मुद्दयावरही तेढ निर्माण करण्यासाठी सत्तास्थानी असणारे खतपाणी घालत आहेत. एक देश, एक घटना, समान संधी, समान न्याय असा विचार करणार्‍या शक्ती बळकट झाल्या, तरच देश एकसंघपणे उभा राहिल. भाषा आणि जात, तथाकथिक प्रादेशिक अस्मिता असा संकुचित विचार करुन केलेले मतदान देशाच्या प्रगतीला बाधा आणणार नाही ना? त्याचप्रमाणे व्यवस्था परिवर्तनाच्या नावाखाली अराजकता निर्माण करणार्‍या शक्तींचा धोका ओळखून मतदान केले पाहिजे.
देशातील अडीच कोटी युवा मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पिढीला विकासात रस आहे. तिची लोकशाहीवरची श्रध्दा कायम ठेवायची असेल, या पिढीचे भवितव्य उज्वल करायचे असेल. तर अर्थव्यवस्थेला गती देणारे, विकासाची कास धरणारे, भ्रष्टाचाराला थारा न देणारे, सक्षम सरकार आवश्यक आहे. असे सरकार लाभणे आपण मतदानाचा हक्क कसा बजावतो. यावर अवलंबून आहे. देशासाठी आश्‍वासक वातावरण निर्माण करण्यासाठीच आपले मतदान होते आहे ना, याचाही विचार करणे गरजे

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें