मंगलवार, 24 दिसंबर 2013

वासनांधांना चौकात फोडा!

आपल्या देशातील काही तरुणांचा ओढा पाश्‍चात्य संस्कृतीकडे आहे. यामध्ये दिवसेंदिवस काही प्रमाणात तरी वाढ होत आहे. तेथील मोकळे वातावरण आपल्याला बरे वाटते. परंतु तेथे बलात्कार झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाचनात येत नाहीत.कारण तेथे फालतू नखरे चालतच नाहीत. गुन्हा केला की कडक शिक्षा हेच सुत्र तेथे अवलंबिले जाते. याउलट भारतात आहे. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू हा परकीय विचार आपल्यापैकी काही जणांना प्रिय आहे. आणि त्यांची त्याच दिशेने वाटचाल असते. नुकतेच कर्नाटकातील मंगळूरु येथे आठ वासनांधांनी एका प्रेमी जोडप्याचे अपहरण करुन त्यांना निर्जन स्थळी नेले. आणि तेथे त्यांना सर्वांसमक्ष सेक्स करण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच तरुणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर त्यांनी सर्वासमक्ष सेक्स केले. त्याची या तरुणांनी व्हिडीओ क्लिप काढून ती कॉम्पुटरवर टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या वासनांध तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी काही दिवसांनी हे वासनांध उजळ माथ्याने समाजात वावरताना आपल्याला दिसतील. याची अनेकांना खात्री आहे. हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे.
वास्तविक पोलिसांनी या वासनांध तरुणांवर कायद्याची अशी कलमे लावली पाहिजेत की त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप झाला पाहिजे. आणि पुन्हा असले कृत्य करताना त्यांनी हजारदा विचार केला पाहिजे. परंतु दुर्दे:वाने असे होताना दिसत नाही. कोणताही गुन्हा करा आणि काही महिन्यांनी अथवा वर्षांनी बिनधास्तपणे बाहेर फिरा हीच वस्तुस्थिती असल्याचे दिसते. एखाद्या महिलेवर बलात्कार करणार्‍या आरोपीला त्याचे काहीही सोयरसुतक नसते. परंतु त्या महिलेचे पूर्ण आयुष्य उध्दवस्त होते. त्याचे काय? महाराष्ट्रातच महिलांवर अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना महिलांनीच तुडवून मारले होते. हे अद्याप कोणी विसरलेले नाही. त्यातीलच एक अक्कू यादव! त्याला तर न्यायालय आवारातच महिलांनी मारले होते. या वासनांधांना अशीच शिक्षा आवश्यक आहे. गुन्हेगारांना जरब बसलीच पाहिजे. त्याशिवाय त्या शिक्षेला काही अर्थ नाही.
गुन्हेगारांना धाक निर्माण व्हावा या उद्देशानेच युती शासनाच्या काळात एन्काऊंटर चे सत्र सुरु झाले होते. समाजमन बिघडविणार्‍या गुन्हेगारांना, अटक करुन, तुरुंगात खितपत ठेवून काय उपयोग? यामुळे केवळ शासनाचा पर्यायाने जनतेचाच पैसा पाण्यात जातो हे कोणीही मान्य करेल. त्याला चाप बसविण्याचे कार्यच एन्काऊंटरच्या माध्यमातून केले गेले.  या संपूर्ण पार्श्‍वभूमीवर नाना पाटेकर यांचा अब तक छप्पन हा चित्रपट आला होता. त्यामध्ये यामागची मानसिकता नेमकीपणाने स्पष्ट करण्यात आली आहे. आता तरी मंगळुरु येथे काय झाले? सदर आठ तरुणांची जोडप्यास सेक्स करतानाची क्लिप काढण्याची हिंमत्त तरी कशी झाली?  कारण घरात संस्कार नाहीत. आणि आपण कसेही वागलो तरी चालते या समजतुनेच हा प्रकार झाला असे म्हटले तर वावगे होणर नाही. सेक्स आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. नेट चालू केले आणि अश्‍लिल वेबसाईट टाकल्या की झाले. त्याचाच हा परिपाक! देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर तरुणांच्या मनात देश स्वतंत्र करायचा एवढेच ध्येय होते. आता भरकटलेल्या तरुणांच्या मनात बाई, बाटली शिवाय दुसरे काय असते? या तरुणांना वठणीवर आणणे अत्यावश्यक आहे. याकरिताच शिक्षेचा धाक गरजेचा आहे. या प्रकरणातून मंगळूरचे वासनांध सुटले तर त्यांची भिड चेपेल आणि ते पुन्हा नव्या जोडप्याच्या शोधात भटकत राहतील.याकरिता पोलिसांनीच त्यांना जमावाच्या ताब्यात दिले ेपाहिजे. मग जमाव त्यांचा सत्कार करेल की रस्त्यात फोडून काढेल? हे सांगायला ज्योतिषाची गरज आहे काय?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें