बुधवार, 22 जनवरी 2014

आता गोप्रेमींची सटकली!

छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यापासून अवघ्या तीस किमी अंतरावर असणार्‍या मोब्रा येथे होणार्‍या सर्वात मोठ्या कत्तलखान्यास काल गोप्रेमींनी प्रचंड संख्येने मोर्चा काढून विरोध केला. राज्यकर्त्यांना केवळ संख्याबळाचीच भाषा समजते. या मोर्चाचे नेतृत्व जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांनी केले. मोर्चात तब्बल 25 हजार गोप्रेमी सहभागी झाले होते. साहजिकच फालतू बातम्यांसाठी हपापलेल्या असणार्‍या कोणत्याही प्रसारमाध्यमांनी ( काही अपवाद वगळून ) या मोर्चाची दखल घेतली नाही. अर्थात याचा काहीही फरक मोब्रावासियांवर पडणार नाही. कत्तलखाना जोपर्यत रद्द होत नाही तोपर्यत यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार गोप्रेमींनी व्यक्त केला आहे.  मतांसाठी हपापलेल्या कत्तलखानाप्रेमी राज्यकर्त्यांना आता नजीकच्या निवडणुकीत खुर्च्या रिकाम्या कराव्या लागणार आहेत. कारण आता गोप्रेमींची सटकली आहे.
अन्याय सहन करण्याला एक मर्यादा असते. राज्यकर्ते जर गोप्रेमींना गृहीत धरत असतील तर ती त्यांची सर्वात मोठी चूक आहे. गायीला हिंदू माता मानतात. आणि या कत्तलखान्यात गायींच्याच हत्या होणार आहेत. मोब्रा परिसरत हा मुसलमान बहुल आहे. त्यामुळे या कत्तलखान्यातून गोमातेच्या रक्ताचे पाट वाहणार होते. त्याला गोप्रेमींनी पायबंद घातला आहे. महत्वाचे म्हणजे एरवी हिंदू कधी मोर्चासाठी घराबाहेर पडत नाहीत. परंतु पू. विनम्रसागरजी महाराज यांनी कत्तलखान्याला विरोध करण्यासाठी प्रचंड जनजागृती केली. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल की जनमताला संघटित करण्यासाठी पू. विनम्रसागरजी हे रोज 30 ते 35 कि.मी. चालत आहेत. गावागावात जाऊन लोकांना एकत्र येण्याकरिता आवाहन करीत आहेत. त्याच्यासोबतीला विविध सामाजिक संघटनांनीही चांगला प्रतिसाद दिला हे महत्वाचे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशात 90 कोटी गोवंश होता. ती संख्या आता अवघ्या 1 कोटीवर आली आहे. लाज वाटावी अशी ही बाब आहे. परंतु प्रतिवर्षी कत्तलखान्यांच्या संख्येत वाढच होत आहे. शेतीचा आधार असणारा गोवंशच अजून काही वर्षांनी इतिहासात जमा होईल अशी आज परिस्थिती आहे. परंतु शासनाचे याकडे लक्ष नाही. गोमातेला वाचवायचे सोडून शासनाने वाघ बचाव ही योजना हाती घेतली आहे. वाघाचे संरक्षण महत्वाचे आहेच. परंतु या देशातील बहुसंख्य समाज जीला माता मानतो त्या गायीला वाचविण्यासाठी शासन हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. निवडणुकीत जिंकण्यासाठी मतांची लाचारी कोणत्या पातळीपर्यत जाऊन करावी याला काही मर्यादा आहे का नाही? आपल्या देशातून ज्या वस्तू अथवा पदार्थ निर्यात होतात त्यांना शासनाकडून निर्यात कर लावण्यात येतो. परंतु मतांसाठी आंधळे झालेल्या सरकारने गोमांसावरील निर्यात कर रद्द केला आहे. एवढेच नव्हे तर अधिकाधिक गोवंशाच्या हत्या व्हाव्यात यासाठी शासन कत्तलखान्यापासून बंदरापर्यत गोमांस वाहून नेण्यासाठी प्रतिकिलोमिटर शासकीय अनुदान देते. असल्या शासनाकडून कत्तलखाने नाहीतर काय गोशाळा उभारण्याची अपेक्षा करणार?
आता गोप्रेमी जागरुक झाला आहे. ठिकठिकाणी कत्तलीला जाणार्‍या गायी सोडविण्यासाठी तो रस्त्यावर उतरत आहे. प्रसारमाध्यमांनी देखिल याविरोधात आवाज उठवायला पाहिजे. निदान ज्या ज्या वेळी गोप्रेमी रस्त्यावर उतरतील त्या वेळी त्यांच्या कार्याला ठळक प्रसिध्दी दिली पाहिजे. परंतु दुर्दे:वाने ते होताना दिसत नाही. गोप्रेमींनी आपल्या कार्याला किती प्रसिध्दी मिळते याकडे दुर्लक्ष करुन त्यांचे गोरक्षणाचे काम सुरु ठेवले पाहिजे. जनशक्तीच्या रेट्यापुढे शासनाला यापूर्वी अनेक निर्णय रद्द करावे लागले आहेत. हे कधीही विसरु नये. काही प्रसंगाने संघटित झालेली शक्ती भविष्यकाळात देखिल कशी एकसंध राहिल असा प्रयत्न व्हायला हवा. सर्वात महत्वाचे म्हणजे पू. विनम्रसागरजी महाराज यांनी कालच्या मोर्चात जे सांगितले ते कायम लक्षात ठेवले पाहिजे. महाराज म्हणतात, गायीला वाचविण्यासाठी, जिहादला रोखण्यासाठी आपल्याला यापुढे असेच संघटित झाले पाहिजे. अशा प्रकारे जर देशातील 90 कोटी हिंदू एकत्र झाले तर मोब्राच काय तर महाराष्ट्र, देश आणि यापुढे पाकमधील सर्व कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करु! कुत्र्यासारखे मरण्यापेक्षा सिंहासाठी जगून धर्मासाठी मरा!!
हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे. तर आणि तरच या देशाला भवितव्य आहे. अन्यथा पश्‍चातापाने रडत बसण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरणार नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें