मंगलवार, 14 जनवरी 2014

आता सेक्युलर जमात गप्प का?

बांगलादेशमध्ये हिंदूच्या खुलेआम कत्तली सुरु आहेत. आणि आपले सेक्युलर सरकार, ढोंगी मानवतावादी, प्रसारमाध्यमे डोळ्यावर झापडे लावून गप्प बसली आहेत. महात्मा गांधीची तीन माकडे प्रसिध्द आहेत. वाईट काही ऐकू नये, वाईट काही पाहू नये आणि वाईट काही बोलू नये असा संदेश तीन माकडे देत असत. परंतु सध्या माकडे तीच आहेत. परंतु त्यांच्या वृत्तीत फरक पडला आहे. सत्य काही सांगू नये, मतांसाठी सत्य बोलू नये आणि सत्य बघितले तरी निषेध करु नये असे त्यांचे धोरण आहे. बांगलादेशींची मस्ती एवढी वाढली आहे की त्यांनी तेथील हिंदूची घरेदारे पेटवून दिली असून अनेकांना बेघर केले आहे. परंतु त्याची काहीही प्रतिक्रीया बहुसंख्य हिंदूची लोकसंख्या असलेल्या भारतात उमटलेली नाही. आणि कुंभकर्णी झोपेत असणार्‍या भारतीयांमुळे भविष्यात उमटेल याची सुतराम शक्यता नाही.
म्यानमारमध्ये झालेल्या दंग्याचा परिणाम मुंबईतील आझाद मैदानावर जाणवला. येथील काही धर्मांध मुस्लिमांनी थेट महिला पोलिसांवरच हात चालवून त्याचा वचपा काढला. आणि आपले सरकार नुसते बघत बसले. हुतात्मा स्मारकावर लाथा झाडणार्‍या धर्मांधालाही अजून शिक्षा झालेली नाही. त्यावेळीही सेक्युलर जमातीच्या तोंडात कोणीतरी बुच मारले होते. कारण दंगा मुस्लिमांनी केला असल्याने त्याविरोधात प्रतिक्रीया दिल्यास आपल्या सेक्युलर प्रतिमेला तडे जातील ही फालतू भिती त्यांच्या मनात होती. आणि आता बांगलादेशात हिंदू मरत असल्याने सेक्युलर जमात निषेध व्यक्त करुच शकत नाही. तीच जमात मात्र गुजरात दंगलीवर तोंड फाटेस्तोवर बोंबलत असते. लाज वाटली पाहिजे असल्या वृत्तीची! परंतु एकदा लाजच सोडल्यावर दुसरे काय होणार? बांगलादेशात काही दिवसापूर्वी निवडणुका झाल्या. त्यामध्ये मतदान करु नये असा फतवा विरोधी पक्षांनी काढला होता. परंतु त्याला केराची टोपली दाखवत तेथील हिंदूनी सध्या सत्ताधारी असलेल्या आवामी लीगला मतदान केले. आणि सलग तिसर्‍यांदा आवामी लीगने सत्ता हस्तगत केली. याचा राग आल्याने जमात ए इस्लामी आणि बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंदूना टार्गेट करण्यात आले. आणि सामुहिकरित्या त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. यामध्ये अनेक हिंदू गंभीर जखमी झाले. काहींच्या हत्या झाल्या. महिलांवर बलात्कार झाले, घरेदारे पेटवली गेली. तरीही बांगलादेशात आणि इथे आपल्याकडेही सर्व काही शांत आहे.
ज्या पक्षाला हिंदूनी मतदान केले त्या पक्षाच्या नेत्यांनीही हिंदूना अखेर वार्‍यावरच सोडले. आणि भारताने तरी दुसरेे काय केले? साधा निषेध करण्याचे धाडस देखिल अद्याप सरकारने दाखवलेले नाही. हिंदुत्वावादी संघटना व पक्ष देखील शांत आहेत. म्यानमारला मुस्लिमांनी मार खाल्यावर जर येथे प्रतिक्रीया उमटते तर बांगलादेशात हिंदूनी मार खाल्यावर येथे निदान शांततामय मार्गाने निषेध मोर्चे का निघत नाहीत. सेक्युलरवादी, सरकार, प्रसारमाध्यमे यांचे सोडून द्या! परंतु सामान्य भारतीयाला याबाबत काहीच वाटत नाही? वास्तविक सरकारने मतांची लाचारीेचे जोखड झुगारुन देऊन येथील लाखो बांगलादेशींच्या पार्श्‍वभागावर लाथा मारुन त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होते. पण ती हिंम्मत नाही! परंतु सरकारचे मंत्री लोकसभेत मात्र भारतात लाखो बांगलादेशी अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याचे सांगतात काय म्हणावे याला? भारतीय माणूस संवेदनहीन आहे. जोपर्यत संकट आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येत नाही तोपर्यत त्याला जाग येत नाही. आणि ज्यावेळी जाग येते त्यावेळी फार उशीर झालेला असतो.
निवडणुका आल्याने जो तो कोणत्या ना कोणत्या संप्रदायाचे लांगुलचालन करीत असतो. असे असतानाही हिंदूची बाजू घ्यायला कोणी तयार होत नाही. कारण प्रत्येक पक्षाला माहित आहे की यांची मते दुसरीकडे कोठे जात नाहीत. हेच धोरण आत्मघातकी आहे. जोपर्यत आपण एकजूट दाखवत नाही. हे असेच होत राहणार. हे चित्र बदलायला हवे पण केव्हा बदलणार हाच महत्वाचा प्रश्‍न आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें